Wednesday 6 July 2016

गोव्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खताचा वापर

पणजी : गोव्यातील काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जैविक खते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्याचे कृषी संचालक उल्हास पई काकोड यांनी सांगितले की, यंदा काजू उत्पादक वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांना सबसिडीवर जैविक खत उपलब्ध करून देणार आहोत. उत्पादन वाढविण्यातही त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. राज्यात ५५ हजार हेक्टरवर काजूची शेती आहे.

No comments:

Post a Comment